जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
आज विद्याथ्र्यांना अद्ययावत विज्ञानतंत्र्, तंत्रज्ञान, शिक्षण-करिअरमधील प्रचंड स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. ते पेलताना विद्याथ्र्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याची कसोटी लागते. मुलाचा शिक्षणक्रम निवडण्याच्या वेळेस मुलाची भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाची पातळी पालकांना समजणे अधिकाधिक अवघड होत आहे
ज्यांना परीक्षेची खरोखर भीती वाटत नाही, अशा विद्याथ्र्यांमध्ये काही गुण प्रकर्षाने दिसतात. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सर्वात महत्त्वाच्या असतात. या तिन्ही बाबी जन्मजात नसतात; परंतु प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात करता येतात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नांची गरज असते. कॉम्प्युटरमधील सर्व विद्यार्थ्याचा डाटा करप्ट झाल्याने पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा घोळात सापडली आहे. १८ मे ला होणा-या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी मागणी केलेली परीक्षा केंद्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत ७ एप्रिललाया परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अचानक लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याचा डाटाच नाहीसा झाल्याने ही परीक्षा १८ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे निर्धास्त झालेले विद्यार्थी हॉल तिकिट हातात पडल्यानंतर मात्र पुन्हा गोंधळात पडले आहेत. नाशिकच्या अनेक विद्यार्थ्याना पुणे, मुंबई, अहमदनगर यासह राज्यातील अन्य शहरांमधील काही परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. अर्ज भरताना नाशिक केंद्राची मागणी करुनही आयोगामार्फत ही चूक झाल्याचे संबंधित विद्यार्थ्यानी सांगितले. परीक्षेला केवळ दहा दिवस उरलेले असतानाच अचानकपणे केंद्र बदलल्याचे कळल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत आयोगाशी संपर्क साधला असता हॉल तिकिटवर मिळालेल्या केंद्रावरच विद्यार्थ्यानी परीक्षा द्यावी लागेल असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यानी केन्द्र बदलून देण्याची मागणी केली असता आयोगाने नकार दिला आहे . यापूर्वी आयोजित केलेल्या परीक्षेचा डाटा नाहीसा झाल्यामुळे संबंधित परीक्षा जवळपास दीड महिना पुढे ढकलण्यात आली होती. या कालावधीत विद्यार्थ्यानी पुन्हा हे अर्ज भरुन सर्व प्रक्रिया पार पाडली. तरीही आयोगामार्फत परीक्षा केंद्राच्याबाबतीत ढिसाळपणे नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
गुन्हे अन्वेषणाचं काम करण्याची अनेकांची इच्छा असते. सी.बी.आय.मध्ये जाण्यासाठी काय करावं, याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्कंठा आपल्या मध्ये असते.
सी.बी.आय.ची स्थापना १९६३ मध्ये झाली. प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, सरकारी नोकर व उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार, दहशतवाद, बॉम्बस्फोट, माफिया, अंडरवल्र्ड आदी बाबींमध्ये तपास करण्याचं काम सी.बी.आय. करतं. सी.बी.आय.मध्ये विविध प्रकारे भरती केली जाते. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कृषिविषयक घटकावर सर्व साधारणपणे ३० प्रश्न विचारले जातात.ह्या प्रश्नांची काठीण्यपातळी देखील मागील दोन -तीन वर्षात वाढलेली दिसून येते. कृषी घटकामध्ये आकडेवारीवर आधारित प्रश्नांची संख्या वाढली असून अत्यंत नेमकी , अचूक आणि अद्यावत माहिती संकलित करूनच ह्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
पिक पद्धती , विविध पिके,पिकांचे वाण, पिकांच्या वाणांची उत्पादकता विविध पिकांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर हेक्टरी उत्पादन ह्या स्वरूपाचे प्रश्न पीकपद्धती ह्या उप घटकामध्ये विचारले जातात. त्याच बरोबर ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संशोधनात्मक संस्थांच्या बाबत देखील प्रश्न विचारले जातात. मशागत तंत्र बाबतच्या पद्धती आणि त्या मध्ये आधुनिक सुधारणा ह्यांची तयारीदेखील फायदेशीर ठरते. पशुसंवर्धनाच्या बाबतीत विविध संकरीत जाती , त्यांची दुग्धोत्पादन क्षमता, कुक्कुट पालन ह्या बाबींची तयारी सुद्धा करणे आवश्यक आहे. फलोद्यान विकास , मत्स्य विकास , या संदर्भात सिद्ध सखोल तयारी करणे गरजेचे आहे.कृषी अर्थ व्यवस्था ह्या घटकावर संकल्पना बरोबरच आकडेवारीवर देखील प्रश्न विचारले जातात. आकडेवारीची तयारी करताना नेमकेपणाने आणि अद्यावत आकडेवारी संकलित करून लक्षात ठेवण्यासाठी देखील विशेष प्रयत्नांची गरज आहे . दोनशे प्रश्ना पैकी पन्नास प्रश्ना ह्या घटकासाठी असल्याने हा घटक खुप महत्वाचा आहे.हा चाचणी घटक चांगली तयारी केल्यास स्कोरिंग साठी सुद्धा महत्वाचा आहे. ह्या घटकामध्ये सर्व सामान्य विद्यार्थी हि भरपूर सरावाच्या आधारे ५० पैकी ४७ पेक्षाही अधिक गुण मिळवू शकतो.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|